राजापुर परिसरात पडणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीच्या पातळीत वाढ ,पुरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ सज्ज
राजापूर परिसरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे राजापूर मधील नद्यांच्या पाणी पातळी मध्ये वाढ झालेली आहे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धोका निर्माण होऊ शकतो.राजापूरची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता राजापूरमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी एनडीआरएफची एक तुकडी राजापूरमध्ये देखील तैनात करण्यात आलीय.या टिमने आज पुरजन्य भागाची पाहणी केली.आपत्ती ओढवली तर एनडीआरएफची ही तुकडी पुर्णपणे सज्ज झालीय.या भागात एडीआरएफ बोट , असेच पुर आल्यास बचावात्मक साहीत्य घेऊन सज्ज झालीय.पुरजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची ही तुकडी सज्ज झालीय
www.konkantoday.com