शासकीय कामकाजाचा गैरफायदा घेत एका मासळी व्यापार्याने राजीवडा समुद्रातच आरसीसी शेड बांधण्यास केली सुरूवात, स्थानिक मच्छीमारांची तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल
पावसाळी मासेमारी बंदी आणि कोरोना संकटात कोलमडलेल्या शासकीय कामकाजाचा गैरफायदा घेत एका मासळी व्यापार्याने रत्नागिरीतील राजीवडा समुद्रातच आरसीसी शेड बांधण्यास सुरूवात केली आहे. ओहोटीच्या वेळी हे काम केले जात आहे. या अनधिकृत बांधकामाची माहिती मिळताच राजीवड्यातील स्थानिक मच्छिमार आणि व्यापार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकारी, पत्तन विभाग, रत्नागिरी नगर परिषद आणि शहर पोलिसांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
राजीवड्यातच राहणारे एक व्यापारी येथील बंदरावर मच्छिमार नौकांमधून येणारी मच्छि विकत घेतो. याच व्यापार्याने आपल्या या व्यवसायासाठी आवश्यक असणारी शेड चक्क समुद्रात बांधण्यास सुरूवात केली आहे. या शेडमध्ये काम करणार्या कामगारांची राहण्याची व्यवस्थाही याच शेडमध्ये करण्याचे नियोजन असल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात आले. सध्या या शेडच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे लोखंडी (स्टील) पिलर टाकण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वीच हे काम सुरू झाले आहे. या बांधकामामुळे स्थानिक मच्छिमारांचे आणि इतर व्यापार्यांची गैरसोय होणार असल्याचे समजल्यानंतर त्यांनी लेखी तक्रारी केल्या आहेत.याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com