रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येत नसेल तर पालकमंत्री व जिल्हाधिकारी बदला-गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांची मागणी

मुंबईसारख्या महानगरातील कोरोना हळूहळू नियंत्रणामध्ये येत असताना लोकसंख्या विरळ असूनही मागील दोन महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत नसेल तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री बदला आणि कार्यक्षम अधिकारी व जिल्ह्यातील पालकमंत्री नेमावा अशी मागणी गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांनी केली आहे राज्य शासनाने राज्यात निर्बंध लागू केल्यापासून येथील जनता सर्व नियम पाळत आहे सुरुवातीच्या काळात जिल्हाधिकारी व पालकमंत्री आणि दुर्लक्ष केल्याने शेवटच्या टप्प्यात जेव्हा अन्य ठिकाणी नियम शिथिल होऊ लागले तेव्हा रत्नागिरी जिल्ह्यात कडक लाॅकडाॅउन लावण्यात आला जून महिन्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी महत्त्वाची असते हे माहीत असताना कठोर लाॅकडाॅउन मे महिन्यांत का लावला नाही असाही सवाल विकास समितीच्या वतीने करण्यात आला आहे नियोजनशून्य कारभाराचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहे याकडे गाव विकास समितीने लक्ष वेधले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button