मुंबई – गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत आत्तापासून साशंकता


खेड, : मुंबई – गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या ४४ किलोमीटर अंतरा पैकी ३८ किमी हुन अधिक अंतरापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाले असले तरी चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत आत्तापासून सांशकता व्यक्त होऊ लागली आहे. कळंबणी नजीकचे चौपदरीकरण दोन ठिकाणी उखडल्याने महामार्गाचे चौपदरीकरण खरोखच दर्जेदार झाले आहे का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खवटी पासून परशुराम घाटा पर्यतचे चौपदरीकरण कल्याण टोलवेज आइन्फ्रास्ट्रुक्चर या ठेकेदार कंपनीने युद्धपातळीवर हाती घेतले होते. गेली तीन वर्ष्यात ३८ किमीच्या अंतराचे काँक्रीटीकरण होऊन त्यावरून वाहनेही देखील धावू लागली आहेत मात्र, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय नजीकचे चौपदरीकरण उखडल्याने ठेकेदार कंपनीचा खरेपणा दिसून आला आहे. करोडो रुपये खर्च करू तयार कण्यात येत असलेल्या रस्ता दर्जेदार असायला हवा होता मात्र काम पूर्ण व्ह्यायच्य आधीच रस्ता उखडला गेल्याने रस्त्याचे आयुष्य किती असणार या कामावर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगायला हवे.
चौपदरीकरणामुळे महामार्गावरील प्रवास वेगवान होणार होता . किमान तसा दावा केला जात होता मग काम पूर्ण व्हायच्या आधीच रस्त्या उखडू लागल्याने पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मार्गावरून दिवस-रात्र शेकडो वाहने धावत असतात या उखडलेल्या चौपदरीकरणामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसात या खड्ड्याचा विस्तार आणखीन वाढतच जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button