रत्नागिरी जिल्ह्यात बैलांची अवैध वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पोलिसांकडून ताब्यात
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी रस्ता असलेल्या ओंबळी – खेड रस्त्यावरून रत्नागिरी जिल्ह्यात तीन बैलांची अवैध वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पोलादपूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे़ पाेलिसांनी गाडीसह तीन व्यक्तींना गुरुवारी मध्यरात्री ११ वाजता ताब्यात घेतला. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. मात्र, ही जनावरे जिल्ह्यात नेमकी काेठे आणली जात हाेती, याचा तपास पाेलीस घेत आहेत़
www.konkantoday.com