रत्नागिरी तालुक्यातील भाेके रेल्वे स्थानकादरम्याने रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील भाेके रेल्वे स्थानकादरम्याने शुक्रवारी सायंकाळी रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. अक्षय लक्ष्मण नारकर (२८, रा. नीलमणी आर्केड, गयाळवाडी फाटा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत त्याचा लहान भाऊ अमर याने फिर्याद दिली. अक्षय हा सकाळी कामासाठी चिपळूण येथे गेला हाेता. उशिरापर्यंत ताे घरी न आल्याने त्याच्या भावाने माेबाईलवर संपर्क साधला., त्याने उचललानाही.दरम्यान, भाेके स्टेशन मास्तरांनी पाेलिसांना रुळावर मृतदेह आढळल्याची माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या माेबाईलवरून संपर्क साधला असता ताे अमर याला लागला. ताे घटनास्थळी आल्यानंतर हा मृतदेह अक्षयचा असल्याचे निश्चित झाले. याबाबत ग्रामीण पाेलीस तपास करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button