चिपळूण तालुक्यातील भिले बसथांबा येथील अपघातात जखमी तरूणाचा मृत्यू.

चिपळूण तालुक्यातील भिले बसथांबा येथे तीव्र उताराच्या वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या करंबवणे येथील २९ वर्षीय रसिक सिद्धार्थ पवार याचा १४ मार्च रोजी उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात सोमवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता भिले बस थांबा येथे चिंचेच्या झाडाजवळ तीव्र उताराच्या वळणावर रसिकचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या गटारात दुचाकी पडून अपघात झाला होता. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी मृत्यू झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button