
जिल्ह्यातील १४ लाख २२ हजार २१३ लोकांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी आणि शरीराच्या तापमानाची तपासणी केली जाणार
रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत गृहभेटीद्वारे १४ लाख २२ हजार २१३ लोकांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी आणि शरीराच्या तापमानाची तपासणी केली जाणार आहे.
सुमारे महिनाभर चालणाऱ्या या खास मोहिमेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागासह जिल्हा शासकीय रुग्णालय मिळून ५६४ पथके तयार केली आहेत.
विविध प्रकारे प्रय करूनही राज्यातील करोनाबाधित रुग्णांची वाढ आटोक्यात येऊ शकलेली नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राज्यभर राबवली जात आहे. शहर, गाव, वस्त्या, तांडे इत्यादी कोणत्याही ठिकाणी असलेल्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी, अतितीव्र स्वरुपाचे आजार असल्यास उपचार आणि आरोग्य शिक्षण या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com
