ॲड. दीपक पटवर्धन यांनी ‘पत्र जागराच’ वापरलेलं आयुध अत्यंत प्रभावी – मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस

भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी कोरोना कालखंडात प्रशासन, मंत्री, विरोधी पक्ष नेते, खासदार या सर्वांना वेगवेगळ्या प्रश्ना संदर्भात वेगवेगळ्या मागण्या करणारी परिस्थिती स्पष्टपणे मांडणारी अनेक पत्र लिहिली. या पत्रांचा संकलन करून त्याचा एक पुस्तक ‘पत्र जागर’ स्वरूपात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आल. त्यावेळी ॲड. पटवर्धनांनी पत्रलेखनाचे वापरलेले अस्त्र अत्यंत प्रभावी आहे, प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी या अस्त्राचा अचूक उपयोग होतो, असं म्हणत ॲड. पटवर्धन यांनी लिहिलेल्या पत्रांचे संकलन करून तयार केलेला ‘पत्र जागर’ कार्यकर्त्यांपर्यंत पोचूदे. जनमत तयार करण्यासाठी याचा उपयोग होईल, असं म्हणत ॲड. पटवर्धन यांना मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते मा. श्री. प्रवीणजी दरेकर, मा.आ.श्री.प्रसादजी लाड, मा.आ.श्री.रवींद्रजी चव्हाण, माजी खा.श्री.नीलेशजी राणे, माजी आ.श्री.बाळ माने यांचेसह मान्यवर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button