
महावितरणने ३६ तासांच्या विक्रमी वेळेत रत्नागिरी शहर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला
तोक्ते वादळाने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करून चांगलाच प्रभाव दाखविला. रत्नागिरीमधील वीजपुरवठा दि. १६ मे रोजी जोरदार वारा आणि पाऊस यामुळे जागोजागी पडलेल्या झाडे आणि पोलमुळे बंद पडला होता. पूर्वनियोजन असले तरीही पाऊस वारा थांबल्याशिवाय काम सुरू करणे आणि वीजपुरवठा सुरू करणे म्हणजे नवीन संकटांना आमंत्रण होते. अशाही स्थितीत महावितरणने ३६ तासांच्या विक्रमी वेळेत रत्नागिरी शहर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला.
www.konkantoday.com