
बोरज येथील दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी आमदार भास्कर जाधव आक्रमक ,दोषी व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
तौक्ते चक्रीवादळामध्ये तुटलेली विद्युत वाहिनी अंगावर पडून झालेल्या बोरज येथील दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी खेड तहसील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले. गार्डिंग वायर नसल्याने ही दुर्घटना घडली आणि त्याला महावितरणचे अधिकारीच जबाबदार आहेत, हे लक्षात घेऊन पोलिसांनी तपास करावा आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी सूचना बैठकीला उपस्थित असलेल्या पोलीस उपअधीक्षक शशिकांत काशीद यांना केली.
www.konkantoday.com