
चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधदुर्ग या जिल्ह्यांतील ३हजार ६६५गावांमधील वीजयंत्रणेची प्रचंड हानी
गेल्या २४तासांमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधदुर्ग या जिल्ह्यांतील ३हजार ६६५गावांमधील वीजयंत्रणेची प्रचंड हानी झाली. यामध्ये १८ लाख ४३ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, त्यापैकी ५२ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला. चक्रीवादळबाधित उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, असे निर्देश देण्यात आले असून महावितरणचे १३हजार १७२ कर्मचारी दुरुस्तीची कामे अविश्रांत करीत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.
www.konkantoday.com