
जोपर्यंत वाहनचालकांची पूर्ण रक्कम ठेकेदाराकडून दिली जात नाही, तोपर्यंत ठरलेली रक्कम त्या ठेकेदाराला देण्यात येणार नाही -जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती निर्णय
जोपर्यंत वाहनचालकांची पूर्ण रक्कम ठेकेदाराकडून दिली जात नाही, तोपर्यंत ठरलेली रक्कम त्या ठेकेदाराला देण्यात येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.
ही सभा अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व अधिकारी, सभापती उपस्थित होते. केारोनाच्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नियोजनाचे केंद्र सरकारसह सुप्रिम कोर्टानेही कौतुक केले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.
www.konkantoday.com