तौक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर, रत्नागिरी तालुक्यासह काही भागात नागरिकांचे स्थलांतर

आजदुपारपर्यंत चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यातील आंबोळगडकिनारी धडकण्याची शक्यता आहे. वादळा पूर्वीच पावसाने हजेरीलावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाअसून रत्नागिरी तालुक्यातील ३६५ नागरिकांचे स्थलांतरकरण्यात आलेराजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड तालुक्यांना धोकानिर्माण झाला आहे. या पाच तालुक्यात संचारबंदी लागू करण्यातआली आहे.किनारपट्टीवर धोकादायक क्षेत्रातील नागरिकांचेस्थलांतर सुरू करण्यात आले आहे.राजापूर आणि गुहागर तालुक्यातील नागरिकांचे स्थलांतरणसुरू झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील ८५ कच्च्या घरातील
३६५ नागरिकांचे परिसरातील आजू बाजूच्या घरात स्थलांतरसुरू झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button