सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांना कोरोना न होताही ते क्वारंटाईन झालेत की काय अशी शंका येते -आमदार प्रसाद लाड

पुणे, मुंबईतील कोरोनाच्या फैलावाचा दाखला सर्वच जण देत आहेत. येथील अवस्था हळूहळू सुधारत आहे. पण कोरोनाची स्थिती वाईट असलेल्या कोकणाकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांना कोरोना न होताही ते क्वारंटाईन झालेत की काय अशी शंका येते आहे, असा खोचक टोला भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी लगावला. ‘कोकणातील कोरोना रुग्णांना पुरेशा खाटा नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का ? त्यांनी आतापर्यंत कोकणच्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक का घेतली नाही?’, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button