
गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना ऍन्टीजेन तपासणी केंद्र सुरू करावे माजी आमदार विनय नातू यांची मागणी
गुहागर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे मिळून एका ठिकाणी कोरोना ऍन्टीजेन तपासणी केंद्र सुरू करावे व प्रत्येक केंद्रामध्ये दररोज किती टेस्ट होतील याची क्षमता निश्चित करावी व त्याची दररोज प्रसिद्धी द्यावी आणि जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण करावे, असे निवेदन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तसेच ऍन्टीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या पॉझीटीव्ह रूग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींची ऍन्टीजेन टेस्ट होण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबतही सूचना केल्या आहेत.
सरकारच्या अपुर्या व्यवस्था व कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी केलेली नसल्याने व कुटुंबाला ठराविक कालमर्यादा ठरवून दिलेली नसल्यामुळे नागरिक ब्रेक व चेन करण्यास तयार होत नाहीत यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. असेही त्यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com