
महाविकास आघाडी सरकारचे अपयश- बाळ माने
रत्नागिरी – महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील मराठ्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालय टिकवू शकले नाही. त्यामुळे हे अपयश महाविकास आघाडी सरकारचे आहे. यामुळे मराठा समाज या सरकारला माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि भाजपचे कोकणचे नेते बाळ माने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली आणि हे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. याबाबत बोलताना बाळ माने म्हणाले, भाजप सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण विवेचन करून मराठा समाजाला मिळवून दिलेले आरक्षण उच्च न्यायालयातही टिकवले. मात्र महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे ते मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे समस्त मराठा समाजाचा विश्वासघात झाला आहे.
www.konkantoday.com