महामार्ग चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा -नितीन गडकरी*

*__कोकणवासियांच्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडल्याने सर्वच स्तरातून टीकेची झोड उठत आहे. मंत्र्यांसह सरकारच्या डेडलाईनही हुकल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर चौपदरीकरण कामाबाबत झालेल्या सविस्तर आढाव्यानंतर हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. भूसंपादनाचे प्रस्ताव आगामी १५ दिवसांत निकाली काढण्याच्या सूचनाही अधिकार्‍यांना दिल्या..महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या ८४ कि.मी. अंतरापर्यंत चौपदरीकरण कामावर आतापर्यंत १५६४ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र तरीही चौपदरीकरण रखडलेलेच आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button