नागरिकांना घरपाेच धान्य मिळण्यासाठी अत्यावश्यक सेवा पाेहाेचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न

रत्नागिरी जिल्हयाने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे जिल्हा प्रशासनाने आता सर्वच दुकाने बंद ठेवून घरपाेच सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी दुकाने बंद राहणार आहेत. दुकाने बंद राहिल्याने नागरिकांना आवश्यक असणारे सामान मिळणे कठीण हाेणार आहे. नागरिकांची हाेणारी ही गैरसाेय लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नागरिकांना घरपाेच धान्य मिळण्यासाठी अत्यावश्यक सेवा पाेहाेचविण्यासाठी काही किराणा व्यापारी, स्वयंसेवक यांची यादी तयार केली आहे. ही यादी नगर परिषदनिहाय प्रत्येक तालुक्यात करण्यात आली आहे. त्याचे नियाेजन स्थानिक पातळीवर तहसीलदार व नगर परिषद प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे. ही यादी तालुक्यातील सर्व घटकांपर्यंत पाेहाेचविण्याचे प्रयत्न प्रशासनाने केले आहेत. या यादीतील क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक वस्तूंची यादी दिल्यास त्या घरपाेच देण्यात येणार आहेत.
नागरिकांनी घराबाहेर न पडता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button