१० वी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्याची समविचारींची मागणी
रत्नागिरीः कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्या पण सबंधित विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेले परीक्षा शुल्क परत देण्यात आलेले नाही ते शुल्क परत देण्यात यावे अशी मागणी समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्यभरात सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते.प्रत्येक शिक्षण मंडळाचे परीक्षा शुल्क वेगवेगळे असले तरी सरासरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 600 रुपये शुल्क भरल्याचे सांगण्यात येत आहे.
यातील ग्रामीण भागातील पालकांना सद्याच्या लॉकडाऊनच्या काळात ही रक्कम महत्त्वाची आहे.परीक्षाच रद्द केल्यात तर नियमाने परीक्षार्थीचे परीक्षाशुल्क परत करणे हे त्या त्या विभागीय परीक्षा मंडळाचे काम आहे.हे न अनुसरता राज्यात सर्वत्र मागणी होत असूनही हे शुल्क परत का दिले जात नाही ? असा सवाल करुन सदरचे शुल्क परत करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे करण्यात आली असल्याचे समविचारीचे बाबा ढोल्ये,संजय पुनसकर,श्रीनिवास दळवी,रघुनंदन भडेकर,निलेश आखाडे,आदींनी सांगितले आहे.यासाठी कोकण विभागीय परीक्षा मंडळाकडे येत्या मंगळवारी समविचारीचे शिष्टमंडळ भेट देऊन याबाबतची मागणी करणार असल्याचे संजय पुनसकर यांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com