
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणात दोन नवे पंप,अधिक वेगाने पाणी खेचणार
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणाच्या जॅकवेलमध्ये आता मोठ्या क्षमतेचे दोन पंप बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे यासाठी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता २७०अश्वशक्तीच्या या दोन पंपामुळे तासाला सात लाख चाळीस हजार लिटर पाणी खेचले जाणार आहे त्यामुळे शहरातील जलशुद्धीकरणाची टाकी आता अवघ्या सोळा तासांत भरू शकणार आहे यामुळे शहरवासीयांना या पुढे चांगल्या दाबाने पाणी मिळेल असा अंदाज आहे
www.konkantoday.com