
राज्यातील ५० टक्के रेस्टॉरंट व बारचे शटर १ एप्रिलपासून उघडणार नाहीत
राज्यात २ लाख रेस्टॉरंट असून लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात तब्बल ३० टक्के रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद पडले आहेत. त्यात राज्यात रात्री ८ ते सकाळी ७या वेळेत रेस्टॉरंट बंद ठेवल्याने ग्राहकांअभावी या उद्योगाची उलाढाल २० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. वेळेचे निर्बंध व लॉकडाऊनची टांगती तलवार डोक्यावर असताना सरकारकडून कुठलीही मदत मिळत नसल्याने राज्यातील ५० टक्के रेस्टॉरंट व बारचे शटर १एप्रिलपासून उघडणार नाहीत, अशी महिती आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले
www.konkantoday.com