रत्नागिरी शहराजवळील भाट्ये खाडीत बोट पलटी , सुदैवाने जीवितहानी नाही

रत्नागिरी शहराजवळील भाट्ये खाडीत बोट पलटी झाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेली नौका नव्यानेच तयार करण्यात आली होती. सज्जाद साखरकर यांच्या नव्या बोटीची चाचपणी सुरू असताना ही दुर्घटना घडली.भाट्ये येथील खाडीच्या मुखातून बोट समुद्रात नेण्यात येत होती. यावेळी खाडीच्या पाण्याचा करंट बसल्याने बोट खाडीत पलटी झाली. बोट पलटी होताच बोटीतील सहा खलाशांनी खाडीत उड्या घेतल्या. सुरुवातीला खलाशी बचावासाठी उलट्या झालेल्या बोटीवर चढले. या परिसरात मच्छीमारी करणाऱ्या इतर मच्छीमारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या खलाशांच्या बचावासाठी धाव घेतली. सुरक्षेसाठी व लाटांचा मारा कमी करण्यासाठी बुडालेल्या बोटीच्या सभोवताली इतर बोटीच्या मदतीने रिंगण करण्यात आले. प्रथम खलाशांना सुखरूप दुसऱ्या बोटीवर घेण्यात आले. यानंतर बुडालेली नौका राजिवडा खाडी येथे आणण्यात आली. या घटनेत जाळ्याचे सुमारे २ लाख रु चे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button