विविध शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

कोकणातील हापुस आंबा देशातील मोठया शहरांमध्ये शेतक-यांमार्फत थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळाने नियोजन सुरु केले आहे. देशातील नवी दिल्ली, चंदिगड, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, पणजी,बैंगलोर, चेन्रई, हैद्राबाद, इंदोर, भोपाळ या शहरांमध्ये आंबा महोत्सवांचे आयोजन करुन हापुस आंब्यास मोठया प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबत मंत्री महोदयांनी सुचना दिल्या आहेत. आंबा महोत्सवांमुळे परराज्यातील बाजारपेठा आंबा उत्पादकांना उपलब्ध होण्यास मदत होईल. परराज्यांमधील आंबा महोत्सवामध्ये जे शेतकरी सहभागी होण्यास इच्छुक असतील त्यांनी विहित नमुज्यातील अर्ज, 7/12 उतारा (मागील 6 महिन्यातील), ओळखपत्र (आधार कार्ड झेरॉक्स), तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नावे रु. 10.000/- चा धनाकर्षासह आपला अर्ज कृषी पणन मंडळास सादर करावा. अर्जासोबत स्टॉलवर उपस्थित राहणा-या कुटुंबातील व्यक्ती व सहकारी यांचे ओळखपत्रासह शिफारस पत्र शेतक-यांनी देणे आवश्यक आहे. तसेच सहभागी होणा-या शेतक-यांनी अर्जासोबत भौगोलिक मानांकनाच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. परराज्यात हापुस आंब्याकरीता बाजारपेठ स्थापन करण्यासाठी कृषी पणन मंडळातर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नामध्ये कोकणातील शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी आंबा उत्पादकांना केले आह. पत्ता - महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागिय कार्यालय रत्नागिरी, कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी आवार, शांतीनगर, नाचणे ता. जि. रत्नागिरी. (संपर्क श्री. कपील खामकर मो. नं. 8805652233).

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button