
लॉकडाऊनच्या काळातील घरपट्टी माफ करावी ह्या शिवसेनेच्या मागणीची चिपळूण नगराध्यक्षांकडून दखल नाही
कोरोनाच्या परिस्थितीमुळे गतवर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये चिपळूण शहरातील अनेकांचा रोजगार गेला. तसेच आर्थिक स्रोतही बंद झाले. त्यामुळे या कालावधीतील घरपट्टीची रक्कम माफ करावी याबाबत शिवसेनेने दिलेले पत्र भाजपच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी बेदखल केल्यामुळे त्यांना शहरातील नागरिकांच्या भावनांची कदर नसल्याचा आरोप शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com