तिचा जीव वाचला पण तिला दोन्ही पाय गमवावे लागले

मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली भागांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि ट्रान्स हार्बर लोकल सेवेवरही झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरची वाहतूक उशिराने होत आहे.त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, दादर या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली आहे. अशीच परिस्थिती नवी मुंबईतल्या स्थानकांवरही आहे. याच पावसात एक घटना घडली आहे लोकल पकडत असताना एक महिला रुळावरुन खाली पडली आणि तिच्या अंगावरुन ट्रेन गेली. या घटनेत तिचा जीव वाचला आहे पण तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button