
संसर्गजन्य नसलेल्या आजारांच्या लोकांसाठी विशेष पथक तयार करून त्यामध्ये वैद्यकीय अधिकार्याचे मार्गदर्शन देणार
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रयत्नशील होतो. आज कोविडच्या साथीमध्ये संसर्गजन्य नसलेल्या आजारांच्या (नॉन कम्युनिकेबल डिसीज) लोकांसाठी विशेष पथक तयार करून त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा आशावाद जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केला.येथील जिल्हा प्रशिक्षण पथकात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यशाळा व कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बबीता कमलापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले गावडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डाॅ. सतीश गुजलवार, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com