
वाढलेल्या तापमानामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ४१.१३ टक्के पाणीसाठा.
दिवसागणिक वाढलेले तापमान तीव्र पाणीटंचाईकडे घेवून जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्याही तीव्र होत आहे. चालू एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात जिल्ह्यातील ४६ लघुपाटबंधारे धरणांमध्ये प्रचंड बाष्पीभवनामुळे आठवडाभरात सुमारे २.८८ द.ल. घ.मी. पाणीसाठा घटल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. आता या धरण प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ११ एप्रिलच्या अहवालानुसार ९७.२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्याची एकूण टक्केवारी ४१.१३ आहे.
राज्यात एकूण २ हजार ११९७ धरणे आहेत. ज्यात लहान ते मोठ्या संरचनांचा समावेश आहे. राज्याबाहेर पाणीसंकट उभे राहिले असून राज्यातील धरणांमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत एकूण ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अद्याप एप्रिल महिना उलटला नाही आणि पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन प्रशासन स्तरावरून केले जात आहे.www.konkantoday.com