
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या केलेल्या सर्व्हेक्षणात ६१ टक्के विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीने व्हावी असे मत
एकीकडे दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिल मे २०२१ मध्ये होणार असून त्या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत सांगितले. मात्र, त्याच दरम्यान राज्यातील ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणात ६१ टक्के विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीने व्हावी, असं मत मांडलं आहे. तर ऑनलाईन शिकताना अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने ३३ टक्के विद्यार्थ्यांनी यंदाची एप्रिल मे मधील बोर्ड परीक्षाच न देण्याचा निर्णय या सर्वेक्षणात मांडला आहे.
www.konkantoday.com