मिर्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी उर्वरित टप्प्यासाठी भूसंपादन लवकरच
कोकण विभागाला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्या रत्नागिरी -मिर्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात येणार असून आता रत्नागिरी-कोल्हापूर या १३४ कि.मी. लांबीच्या महामार्गाचे शिल्लक असलेले भूसंपादन लवकरच सुरू करण्यात येणार आहे. भूसंपादन प्र्रक्र्रियेबाबत २५ जानेवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. या महामार्गासाठी कुवारबांव परिसरातील भूसंपादनाची प्रक्रिया अद्यापही अपूर्ण आहे. हे भूसंपादनाचे रखडलेले काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com