
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी भेटीच्या वेळी ग्रामपंचायतीला चक्क टाळे
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी डॉ.इंदूराणी जाखड काल अचानक लांजा तालुक्यातील वेरवली ग्रामपंचायतीला भेट दिली तेव्हा ग्रामपंचायतीला टाळं लावलेले आढळले. कार्यालयीन वेळ पावणे सहा असताना पाच वाजण्याच्या पूर्वीच ग्रामपंचायत लवकर बंद करून जाण्याचा हा प्रकार स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनुभवला.
सायंकाळी पाच वाजता डॉ.जाखड वेरवली ग्रामपंचायतीत पोहचल्या तेव्हा त्यांना ग्रामपंचायत बंद असल्याचे दिसले.दरवाजाला कुलूप लावलेले होते.शासनाच्या नव्या धोरणाप्रमाणे कार्यालय सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत सुरू ठेवायचे आहे
www.konkantoday.com