
कोकणातील 52 खाड्या प्रदूषित असल्याचा एका पर्यावरण संस्थेचा अहवाल
नद्यांच्या सागरमुखाशी किंवा खाड्यांवर औद्योगिक वसाहती उभ्या केल्याने कोकणातील 52 खाड्या प्रदूषित असल्याचा अहवाल एका पर्यावरण संस्थेने अलीकडेच प्रसिद्ध केला. त्यामुळे खाड्यांच्या परिघात उभारलेल्या उद्योगांमुळे उद्भवलेल्या पर्यावरण परिणामांची छाननी करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आल्या आहेत. नागरीकरणामध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे ढिसाळ नियोजन, अतिक्रमणांमुळे पात्र अरुंद करण्याच्या प्रकारांमुळे कोकणातील नद्यांचा जीव घोटला गेला आहे. गेल्या दशकभरात औद्योगिक, रासायनिक टाकाऊ पदाथपिक्षाही घरगुती सांडपाणी, मलनिःसारणामुळे नद्या, खाड्या, पाणथळ जागांचे पर्यावरण प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण पर्यावरण अभ्यासकांनी नोंदविले आहे.अलिकडेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोकणातील खाड्यांच्या पर्यावरणाचा अभ्यास केला होता. यात खाड्यातील अनेक प्रकारच्या माशांच्या प्रजाती प्रदूषित पाण्यामुळे नष्ट झाल्याचा मुद्दा नोंदविण्यात आला आहे. अनेक प्रकारच्या कचऱ्यांनी खाड्या प्रदुषणाने वेढल्या गेल्या आहेत. यामुळे टाकाऊ पदार्थांचे विघटन होत नसल्याची नोंद या अभ्यासात घेण्यात आली होती. नद्या किंवा खाड्यांवर एमआयडीसी वसवण्यात आल्याने या खाड्यांची दुरवस्था झाली आहे.www.konkantoday.com