
आज, सोमवारी सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष
करोनासंकटामुळे रूतलेले अर्थचक्र हळूहळू सुरू झाले असले तरी ते वेगाने धावण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागले असून, करोनामंदीतून सावरण्याबरोबरच विकासवृद्धीची झेप घेण्याचे आव्हान सरकारपुढे आहे.
आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
www.konkantoday.com