
लसीकरणासाठी केंद्र सरकारने तयार केलेले ॲप नीट चालत नसल्याने तर १८ ठिकाणी सर्व्हरच बंद पडल्याने,राज्यात लसीकरणाच्या मोहिमेत अडचणी
लसीकरणासाठी केंद्र सरकारने तयार केलेले ॲप नीट चालत नाही. शिवाय १८ ठिकाणी तर सर्व्हरच बंद पडले. त्यामुळे राज्यात लसीकरणाच्या मोहिमेत अडचणी येत आहेत. ज्यांनी लस घेतली, त्या व्यक्तीलादेखील ”लस घ्यायला या” असे मेसेज जात आहेत. तर ज्यांना लस अद्याप मिळाली नाही, त्यांना मेसेजच जात नाहीत, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात पहिल्या दिवशी १८,५७२ जणांना, तर बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८,१६६ जणांना लस देण्यात आली
www.konkantoday.com