
प्रत्येक तरुणांनी आपापली जबाबदारी ओळखून कर्तव्य करत राहिल्यास समाजाचा म्हणजेच राष्ट्राचा विकास होऊ शकताे -न्यायमूर्ती आनंद सामंत
भारतात लोकसंख्येच्या टक्केवारीत जगातील सर्वात जास्त तरुणाई आहे. आज प्रत्येक क्षेत्र या तरुणाईचे स्वागत करायला तयार आहे. काही तरुण आपापल्या क्षेत्रात यशस्वी देखील होत आहेत. अशावेळी समाजातील प्रत्येक तरुणांनी आपापली जबाबदारी ओळखून कर्तव्य करत राहिल्यास समाजाचा म्हणजेच राष्ट्राचा विकास होऊ शकतो. म्हणून दुसऱ्याने कुणीतरी लादण्यापेक्षा तरुणांनी स्वतः पुढाकार घेत जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा रत्नागिरी जिल्हा न्यायमूर्ती आनंद सामंत व्यक्त केले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित लोकनेते शामराव पेजे स्पर्धा परीक्षा वाचनालय वाटद खंडाळा यांच्या वतीने आणि वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे यांच्या सहाय्याने सुरू असलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
www.konkantoday.com