
केंद्राने गरीबांना लस मोफत दिली नाही तर राज्य सरकार विचार करेल-आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात गरिबांना मोफत लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. श्रीमंत लोक लस विकत घेऊ शकतात. मात्र, गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्राने गरीबांना लस मोफत दिली नाही तर राज्य सरकार विचार करेल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com