
विमा योजनेतील जाचक अटींमुळे बागायतदार, शेतकरी अद्यापही नाराज
बदलत्या हवामानामुळे आंबा, काजू पिकांच्या उत्पन्नात दरवर्षी मोठी घट होत आहे. यावर उपाययोजना म्हणून शासनाने फळपिक विमा योजना जाहीर केली आहे. योजनेतील जाचक अटींमुळे बागायतदार, शेतकरी अद्यापही कमालीचे नाराज आहेत नुकसानीच्या तुलनेने मिळणारी आर्थिक मदत अत्यल्प असल्याने बागायतदार, शेतकर्यांनी फळपीक विमा योजनेकडे पाठ फिरवून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com