मा. खासदार श्री. सुरेश प्रभू – रत्नागिरी विमानतळावर विमान सेवा सुरू करण्यासाठी सक्रीय


मा. खासदार श्री. सुरेश प्रभू यांनी सिव्हिल एव्हिऐशन मंत्री श्री. हरदीप पुरी यांचेकडे पत्रव्यवहार केला असून व्यक्तिगत भेट घेऊन मंत्रीमहोदयांना रत्नागिरी विमानतळाचे मार्फत लवकरात लवकर विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा व कोकणच्या गतिमान विकासाचा मार्ग सुकर करावा, असे आवाहन मा. श्री. हरदीप पुरी यांना केले आहे.
मा. खा. श्री. सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा सुरु केला असून लवकरच रत्नागिरी विमानतळा संदर्भातील प्रश्न निकालात काढू असा विश्वास व्यक्त केला.
मा. खा. श्री. सुरेश प्रभू यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक विध जबाबदाऱ्या यशस्वी पार पडल्या असून मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे निकटवर्तीय असलेल्या पैकी एक श्री. प्रभू अशी यांची ओळख आहे. कोकणच्या प्रश्नावर सातत्याने लक्ष देत कोकणच्या विकासाला पूरक उपक्रम सातत्याने राबवत आहेत कोकण रेल्वेचे विद्युतीकरण, शक्यत्या ठिकाणांच्या मार्गाचे डबलिंग, अनेक स्टेशनमधील सुधारणा, रत्नागिरी अलफान्सोची नोंद, आंबा वाहतुकीस कोकण रेल्वेच्या सुविधा, जनशिक्षण संस्थेची रत्नागिरी प्रस्तावित शाखा असे अनेक निर्णय मा. खा. श्री. प्रभू साहेबांनी आपला प्रभाव वापरून मार्गी लावून कोकणच्या जनतेला दिलासा दिला आहे.
विमानतळाचा प्रश्न हा अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नावर मा. खा. श्री. सुरेशजी प्रभू यांनी पुढाकार घेतल्याने आता रत्नागिरीतही विमानसेवा सुरू होईल अशी आशा निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button