गावपातळीवर इंटरनेट पोहोचविण्यासाठीच्या ‘पीएम वाणी’ योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली

गावपातळीवर किराणा दुकान, पान दुकानांच्या मदतीने वाय-फायद्वारे इंटरनेट पोहोचविण्यासाठीच्या ‘पीएम वाणी’ योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली. यासोबत लक्षद्वीपनजीकचा ११ द्वीपांचा समूह ब्रॉडबॅन्ड सेवेने जोडणे आणि चीनच्या आक्रमक माहिती युद्धाला तोंड देण्यासाठी अरुणाचल प्रदेश, आसामच्या दुर्गम भागामध्ये ‘४ जी’ सेवा सुरू करणे, या महत्त्वाच्या निर्णयांवरही सरकारने आज शिक्कामोर्तब केले.सार्वजनिक ठिकाणी ‘वाय-फाय’द्वारे इंटरनेट सेवा देण्यासाठी एक कोटी सार्वजनिक डेटा केंद्र सुरू केले जातील. ही केंद्रे चहाची दुकाने, किराणा, पान दुकानांवरही असतील. यासाठी परवान्याची आणि नोंदणीची गरज नसेल. तसेच, कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्थात, यावरून मिळणाऱ्या इंटरनेट सेवेसाठी ग्राहकांना बाजार दराने शुल्क द्यावे लागेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button