
शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मात्र अल्प
राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत त्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्य़ातही शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता शाळा सुरू करताना पालकांची संमतीपत्रे घेण्यात यावीत अशाही सूचना करण्यात आल्या होत्या तसेच शाळेत येण्याची सक्ती करू नये असेही शासनाकडून सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळातील वर्गांना विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे शहरी भागात ऑनलाईनवरून शिक्षण घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातया वर्गात मिळून अंदाजे त्र्याऐंशी हजार विद्यार्थी असून त्यापैकी शाळेत येण्यासाठी फक्त अंदाजे तेरा हजार विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे
www.konkantoday.com