
कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना योद्ध्यांनाच प्रथम लस दिली जाणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दुसरीकडे कोरोनाची लस निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकताच कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली. अशावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना योद्ध्यांनाच प्रथम लस दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
www.konkantoday.com