
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे-मनसे नेते अनिल शिदोरे
केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जगभरातून समर्थन देत आहेत. आहे. या कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. विविध पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. परंतु, मनसे नेत्यांनी याविरोधात भूमिका घेतली आहे.
शेतकरी आंदोलनावर मनसे नेते अनिल शिदोरे यांनी म्हंटले कि, आपण वर्षानुवर्ष पाहिलं की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बिमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले, आता येथून सरकारनं माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल.
www.konkantoday.com




