
रत्नागिरी जिल्ह्याला आज यलो अलर्ट
हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीत पावसाची जोरदार सरी पडतआहेत. रत्नागिरीसोबतच लांजा, राजापूर, संगमेश्वरसह जिल्ह्यातील इतर भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २९.१५ मि.मी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे राजापूर आठवडी बाजारात आलेल्या नागरीकांची तारांबळ उडाली असून दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.