सिंधुदुर्गची दयनीय अवस्था ठाकरे सरकारने केली आहे-खासदार नारायण राणे

वादळाने नुकसान झालेल्यांना भरपाई मिळालेली नाही. भात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत दिलेली नाही. दरवर्षी येणारा विकासाचा फंडदेखील आला नसल्याने विकासाच्या बाबतीत सिंधुदुर्गची दयनीय अवस्था ठाकरे सरकारने केलेली आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली. तसेच कोरोनाच्या संसर्गवाढीलादेखील ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.लोकोपयोगी कोणतेही निर्णय या सरकारला घेता आलेले नाहीत. केवळ लॉकडाउन करून हे बंद, ते बंद करणं एवढंच काम हे सरकार करतंय. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणं किंवा विकासकामं सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही.”
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button