चिंचखरी (ता. रत्नागिरी) येथील गटशेती प्रकल्पाला मुंबई जिल्हा बँकेकडून ५० लाखाचे अर्थसाह्य

रत्नागिरी जिल्ह्यातील गटशेतीला चालना मिळावी, यासाठी चिंचखरी (ता. रत्नागिरी) येथील गटशेती प्रकल्पाला मुंबई जिल्हा बँकेकडून ५० लाखाचे अर्थसाह्य दिले जाईल, अशी माहिती बँकेचे संचालक आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. लाड बोलत होते. ते म्हणाले की, चिंचखरी येथे ७६ शेतकरी एकत्र आले असून ते १२५ एकरवर शेती करत आहेत. मात्र गेली काही वर्षे सुरू असलेल्या या गटशेतीकरिता नाबार्ड, जिल्हा बँक, अग्रणी बँकेकडूनही मदत मिळत नाही. त्यासाठी आता मुंबई जिल्हा बँक ५० लाखांचे अर्थसाह्य करणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाला की आणखी पाच कोटीची मदत दिली जाईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button