एसटीच्या दिवाळी स्पेशल गाड्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार

एसटीच्या दिवाळी स्पेशल गाड्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार
लॉकडाऊनमध्ये गेले काही महिने बंद असलेली एसटीची वाहतूक सेवा आता पुर्वपदावर येत आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळामार्फत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ११ नोव्हेंबर पासून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
दीपावलीनिमित्त मुंबई आणि पुण्यासह मोठ्या अन्य जिल्ह्यातून चाकरमानी मोठ्या संख्येनेे गावी येतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ११ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
दापोली आगारातून परळी, शिर्डी, अक्कलकोट, गणपतीपुळे, नालासोपारा, चिंचवड, पंढरपूर, नाशिक मार्गावर एकूण १६ फेर्‍या सोडण्यात येणार आहेत. खेड आगारातून बोरिवली, मुंबई, ठाणे, बीड मार्गावर आठ फेर्‍या सोडण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून परळी, चिंचवड, बोरिवली, बेळगाव, कल्याण, भांडूप, तुळजापूर, पुणे (विश्रांतवाडी), कल्याण-नाशिक मार्गावर १४ फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी आगारातून लातूर, तुळजापूर, अक्कलकोट, मुंबई, गडहिंग्लज, चंद्रपूर, कोल्हापूर, औरंगाबाद मार्गावर १४ फेर्‍यांचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. लांजा आगाररून पुणे व कोल्हापूर (औरंगाबाद) मार्गावर चार, राजापूर आगारातून इचलकरंजी, चिंचवड, नगर, शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबाद मार्गावर सात तर मंडणगड आगारातून बोरिवली मिळून एकूण ९१ फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. या फेर्‍यांचे वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. या गाड्यांसाठी ऑनलाईन आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button