रत्नागिरीचे वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांची रायगडला तर ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश कदम पालघरला बदली
जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांची रायगड येथे बदली झाली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाला आयएसओ मानांकन मिळवून देणे, वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून वाहतुकीला शिस्त लावणे, आदी कार्यात अनिल विभूते यांचे योगदान होते. शहर वाहतूक शाखेचे सुसज्ज कार्यालय देखील त्यांनी उभे केले होते वाहतुकीचे नियम तोडणार्या कडून दंड स्वरूपात त्यांनी मोठा महसूल शासनाला मिळवून दिला होता तर ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश कदम यांची पालघर येथे बदली झाली आहे
सुरेश कदम यांनी आपल्या कार्यकालात अनेक महत्वपूर्ण गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला होता
www.konkantoday.com