
राज्यातील सर्व आरटीओ डिजिटल करण्याच्या पहिल्या टप्प्याला दसर्यानंतर सुरुवात होणार
राज्यातील सर्व आरटीओ डिजिटल करण्याच्या पहिल्या टप्प्याला अखेर येत्या दसर्यानंतर सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात डुप्लिकेट लायसन्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वाहन चालकांना संबंधित कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्याची व्यवस्था केल्याने आरटीओमध्ये फेर्या मारण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच आरटीओंमधील खिडक्यांवरील गर्दी आता कमी होणार आहे.
काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर येत्या १०दिवसांत ई-सहीला सुरुवात होईल. त्यामुळे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागामध्ये संपर्क विरहित कारभाराची सुरुवात होईल. यामुळे कोरोनाच नव्हे, मात्र इतर वेळीही वाहनचालक आणि नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे.
www.konkantoday.com