रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्‍सीजन पुरवठा रायगड येथून केला जाईल, वरिष्ठांचे आश्वासन- जिल्हाधिकारी यांची माहिती

रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्‍सीजन पुरवठा रायगड येथून केला जाईल, असे आश्‍वासन सचिवांकडून मिळालेले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार चिपळूण येथील एका उद्योगासाठी आलेला ऑक्‍सीजन टॅंकर सोडून देण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
चिपळूणमधील इंडस्ट्रीसाठीचा ऑक्‍सीजन टॅंकर प्रशासनाने जप्त केला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो टॅंकर सोडा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागणाऱ्या ऑक्‍सीजनची व्यवस्था केली जाईल असे आश्‍वासन दिले गेले.रत्नागिरी जिल्ह्याला दररोज सुमारे 15 किलोलीटर ऑक्‍सीजनची गरज लागते. सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर नसुन ऑक्‍सीजनचाही तुटवडा जाणवत नाही. नुकताच खेड येथे एक ऑक्‍सीजन टॅंकर मिळाला आहे. सचिवांनीही रायगड येथून ऑक्‍सीजनची व्यवस्था जिल्ह्याला करुन दिली जाईल असे सांगितले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button