नाणार समर्थकांच्या भावना मुख्यमंत्री व माननीय शरद पवार यांच्याकडे पोहोचव्यात–राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मागणी

राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरात प्रस्तावित असलेला रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प आता स्थानिक जनतेला हवा असून सुमारे ८० टक्के स्थानिकांनी या प्रकल्पाचे समर्थन केलेले आहे. त्यामुळे प्रकल्प समर्थकांची ही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवावी अशी मागणी शनिवारी राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे करण्यात आली आहे.याबाबतचे एक निवेदन व प्रकल्प समर्थक जमिन मालकांच्या सुमारे साडेआठ हजार एकर जमिनीची समंत्रीपत्र राजापूर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार यांनी ना. आव्हाड यांच्याकडे सुपुर्द केली आहेत. बार असोशिएशनच्या या शिष्टमंडळाने मुंबईत ना. आव्हाड यांची भेट घेतली.समर्थकांच्या भावना मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवारांपर्यंत पोहचविण्याची मागणी केली
साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रेही सादर केली
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांची भेट घडवून देण्याची ना. आव्हाड यांनी शिष्टमंडळाला ग्वाही दिली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button